स्वच्छ चारीत्र्य,नितीमान नेता काळाच्या पडद्याआड
राजकारण ,समाजकारण, अर्थकारण यात निपुण असलेला नेता म्हणजे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर होय.त्यांच्या जीवनशैलीवर आर्यसमाजाचा प्रभाव होता.
कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारे नेतृत्व. जीवनात बदली,नौकरी शिफारशीसाठी दादानी कोणाकडून ही एक छदाम घेतला नाही.
शाकाहारी बेसन,दही,शेंगदाणा चटणी त्यांचे आवडते जेवन होय.
औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी दादा स्वतः दिल्लीत बसून तत्कालीन पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांना भेटले होते.
अधिकाऱ्यावर एक नैतीक धाक होता.मुख्यमंत्री पदापासून ते जवळपास सर्व खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भुषवले.त्या पदाला न्याय देण्याचे काम दादानी केले. लातूर जिल्हा निर्मिती, माकणी धरण,मसलगा मध्यम प्रकल्प, घरणी प्रकल्प, साकोळ प्रकल्प विवीध कोल्हापूर बंधारे दादानी उभी केली.
एक वेळेचा प्रसंग दादासोबत कुंथलगिरी येथे जैन मंदिरात जाण्याचा आला.त्यावेळी उंच डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नव्हता.वरती पाण्याचे खूपच हाल होते.
दादा भर ऊन्हात शेवटच्या पायरीवर उभे राहून सभोवताली नजर टाकत होते. मंदिरात पाणी आणायचे कोठून चेहरा लाल झाला होता. त्यांना कल्पना सूचली ए सी बोलावून आताच मला या ठिकाणी तलाव निर्माण करायचा आहे.सर्वे दोन दिवसात पूर्ण करा.प्रस्ताव तयार करून स्वतः मुंबईला या.एक वर्षात प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. त्यावेळी दादा सार्वजनीक पाटबंधारे मंत्री होते.एक वर्षात प्रकल्प पूर्ण झाला. कामाचा उरक,निपटारा लवकर करायचे.
राजकारण म्हणजे खोटे बोलणारे,आश्वासन देणारे, दाबदडप करणारे अथिक असतात. तोंडावर सडेतोड बोलणारे दादा रागात आल्यास हलकट,बेखूब,मूर्ख आहेस असे बोलायचे दादासाहेबां बरोबर अनेक वेळा जेवनाचा योग आला.मोठे गुरूजी थोडं जेवन करा .शरीराने मोठे असल्याने दादा नेहमी मोठे गुरूजीच म्हणायचे ते माझ्या आजोबा समान असल्याने मलापण आनंद वाटायचा.अन्यायाची चीड अन् न्यायाची चाड असणारे दादासाहेब माझ्या पहाण्यातील राजकारणातील एकमेव नेते होय.
दलबदलू,पक्ष बदलणाऱ्या बंडखोरांची त्याना खूपच चीड होती. मी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत पक्षाशी गददारी केली नाही. साधी राहणी उच्च विचार श्रेणी होती. अनेकजन दादासाहेबांना सोडून गेले.लवकरच वैकुंठगमन ही केले. मुख्यमंत्री असताना विरोधकांनी मुलीच्या एम डी प्रकरणात राजीनामा मागितला दादांनी क्षणाचा ही विलंब नकरता सत्य लपत नसते म्हणून राजीनामा दिला.
सदरील प्रकरणात जवळच्याच मानसाचा सहभाग होता.नंतर सर्वांना समजले. लातूर तसे कर्णाटक आंध्रप्रदेश सिमेजवळील गाव पण मुख्य रस्ते दळणवळण साधणे,शैक्षणीक संस्था ,विद्युतीकरण, औद्योगिकरण,गाव तिथे शाळा,पाणी यावर त्यांनी अधिक भर दिला. सार्वजनीक कामांना अधिक गती देणारा नेता म्हणजे दादासाहेब. मला भेटण्यासाठी मुंबईत कामधंदा सोडून खर्च करीत यायचे नाही. मला फक्त मोठे गुरूजी फोन करा.तस मी,गावाकडे येतच असतो.अनेकांचा विचार करणारा,जात,धर्म, न पहाता मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारा एकमेव नेता. दादासाहेब तुमची नेहमी आठवण येत राहील, महाराष्ट्राने एक चारीत्र्य संपन्न,नितीमान नेता गमावला. आम्ही दादासाहेब आजोबांच्या प्रेमाला पोरखे झालो. निलंगा शहरात आता थोडंतरी जेवन कर का ,आला होता मोठे गुरूजी ?वहान आहे की, सोडून यायला सागतो- असं कोणीही म्हणणारे नाही. ईश्वर आपणास सदगती देवो.आपल्या आत्म्यास सदैव शांती लाभो.
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
0 Comments