Latest News

6/recent/ticker-posts

सात कोटीचा जिल्हापरिषद शिक्षक...

ज्येष्ठ पत्रकार: संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून..

 सात कोटीचा जिल्हापरिषद शिक्षक...

ज जिल्हापरिषद शाळेत शिकल्याचा प्रचंड आनंद झाला..युनेस्को व वार्की फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. हा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय आहेत. त्यांना मिळालेल्या 7 कोटी पुरस्कार राशीपैकी अर्धी रक्कम, त्यांनी या पुरस्काराच्या इतर 9 नामांकित शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. जेणेकरून ते त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने कार्य करू शकतील. गुणवत्ता कॉन्व्हेन्ट शाळेतच असते ग्राह्य धरून लाखोंची फिस भरणाऱ्या पालकांनी आता आपला मोर्चा जिल्हापरिषद शाळांकडे वळवायला हरकत नाही..गुणवत्ता प्रचंड आहे मात्र त्यांना पूरक वातावरण देण्यात आपण खेड्यात कमी पडत आहोत.माझ्या शाळेतील शिक्षकांनी दोन वर्षात प्रचंड बदल केला.सुरुवात गणवेष पासून झाली..परिसरात केलेल्या विविध गोष्टी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्कीच भर घालत असतात..बदल घडवण्यासाठी सशक्त मानसिकतेची गरज नक्कीच आहे..या पुरस्कारामुळे समस्त जिल्हापरिषद शिक्षकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन नक्कीच बदलेल.त्यासाठी शिक्षकांनीही आपल्या मानसिकतेत बदल करायला हवे..नवनवीन गोष्टी करत राहायला हव्यात..शिक्षकांचा दरारा असायला हवा..मला आजही माझे जोशी सर आठवतात..ते गावात फिरू लागले की मुले घरात पळून जायची..ते सगळे कुटुंब सोडून गावात राहायचे,सगळ्या कार्यक्रमात अग्रभागी असायचे..मोफत रात्री tution घ्यायचे.वेळप्रसंगी शिक्षा करायचे आणि कोतूक करायला विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जायचे..गावात मान होता,सन्मान होता..आम्हाला त्यांची मुले आणि कुटुंब कधी दिसलेच नाही..सुट्टीमध्ये ते घरी जावून यायचे मात्र चोवीस तास त्यांच्या डोक्यात विद्यार्थीच असायचा..हल्ली नवीन शिक्षकांची पिढी सगळं करायला तयार आहे मात्र त्यांना वातावरण तसे मिळत नाही..देसले यांच्या या ग्लोबल पुरस्कारामुळे जिल्हापरिषद शाळेचा शिक्षक ग्लोबल लेव्हलला पोचले आहेत,.अनेक शाळेतील शिक्षकांची घुसमट होते,बाकीचे शिक्षक त्यांना नियोजित कामेच करा आम्हाला त्रास होतो असे म्हणत खाच्चीकरण करताना दिसतात..आता ते थांबायला हवे..ज्या शिक्षकांना काही नवीन करायचे आहे त्यांना प्रशासनाने करू द्यायला हवे..शिक्षकांनी शिक्षण महत्त्वाचे मानून काम करायला हवे,हल्ली शिक्षक निवडणुकांच्या याद्यात,लसीकरणाच्या कामात अडकलेला दिसतो.त्याना मूळ कामाला जावू द्या. त्यांच्यातील कलागुणांचा विकास करू द्या..राजकारण्यांच्या दारात गेलेल्या शिक्षकांना कामाला लावायला हवे..त्यांना नवनवीन प्रोग्राम द्यायला हवेत..काही काही शिक्षक अफलातून हुशार आहेत..त्यांच्यातील गुणवत्तेला चालना द्यायला हवी..त्यांचे कुणीतरी ऐकून घ्यायला हवे..प्रायोगिक शिक्षकांना स्वतंत्र ट्रेनिंग मिळायला हवी..माझ्या शाळेत काही शिक्षक आहेत..विद्यार्थ्यांना अनेक craetive गोष्टी शिकवत असतात..विद्यार्थी शिक्षकाला कळतो,कोण काय बनणार आहे याचे त्यांना ज्ञान असते..त्याला पूरक गोष्टी द्यायला हव्यात..आज देसले यांच्या ग्लोबल पुरस्कारामुळे एक बरे झाले अडगळीत पडलेल्या,अनेकांच्या रोषाला बळी पडलेल्या शिक्षकांची मान नक्कीच उंचावली.जिल्हापरिषद शाळेच्या गुणवत्तेला एक चमक या निमित्ताने नक्कीच आली आहे.. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे सर्व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन..

 संजय जेवरीकर{ज्येष्ठ पत्रकार}

Post a Comment

0 Comments