Latest News

6/recent/ticker-posts

वाढीव वीजबिलप्रकरणी मनसेने घातला महावितरणच्या अभियंत्याला घेराव

वाढीव वीजबिलप्रकरणी मनसेने घातला महावितरणच्या अभियंत्याला घेराव



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) अहमदपुर गेली चार महिन्यांपासून जनता लॉकडाऊन मध्ये बेरोजगार असताना कुठलीही कल्पना न देता महावितरण ने केलेल्या वीजदर वाढीचा निषेध व्यक्त करत मनसेने अहमदपूर येथील महावितरण कार्यालयात जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्याला घेराव घालत ठिय्या मांडला व पीडित शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करण्यास भाग पाडले.तालुक्यात अनेक गावातील शेतकऱ्यांना त्यांचे मीटर रिडींग न बघता वर्षानुवर्षे कार्यालयात बसूनच वीजबिल पाठवले जात आहेत.त्यातच आता वीज दर वाढवला आहे.या महामारी मध्ये लोकांच्या हाताला काम नसताना हजारो रुपयांचे वीजबिल कसे भरणार असा प्रश्न मनसेने उपस्थित करत अगोदर चार लाख शेतकऱ्यांचे २०१२ ते २०१९ पर्यंतचे तीस हजार कोटी जे कोर्टाने महावितरणला शेतकऱ्यांना वाढीव युनिट लावून लुटल्याबद्दल परत करा असा निर्णय दिला आहे ते परत करा असे डॉ भिकाणे यांनी सांगितले व जोपर्यंत ही शेतकऱ्यांची लुटलेली रक्कम तुम्ही परत करत नाहीत तो पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याची वीजबिल भरणा न केल्यामुळे लाईट कट केली तर मनसे तुमच्या कार्यालयाची वीज कट करेल व प्रसंगी शेतकऱ्यांसाठी कायदा ही हातात घेईल असे सांगितले.या ठिय्या आंदोलनानंतर अभियंत्यानी पीडित शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले. 


हे महावितरण कार्यालय नाही तर वर्षानुवर्षे तीन च्या विजपंपाला पाचच्या पंपाचे, पाचच्या पंपाला साडेसात चे,साडे सातच्याला दहाचे वाढीव बिल लावून शेतकऱ्यांचे तीस हजार कोटी लाटलेले महलूट कार्यालय आहे व हे कोर्टात सिद्ध होऊनही आणखीन ती रक्कम शेतकऱ्यांना परत न करता आजही त्याच प्रकारे वाढीव युनिटणीच बिल आकारणी करणारे हे कार्यालय शेतकऱ्यांना 'महाचूना' लावत आहे.एवढेच नाहीतर शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची ही फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचे अनुदान यांनी शेतकऱ्यांच्या नावावर लुटले आहे.ही दुहेरी लूट यांनी बंद नाही केली तर मनसे खळखट्याक करणार अशी प्रतिक्रिया डॉ.नरसिंग भिकाणे यांनी दिली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे,भुजंग उगीले,माधव राठोड,कृष्णा जाधव,अतिष गायकवाड आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments