बांबु लागवडीचे Online अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर:(जिमाका) दि. 3 - कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत लातूर जिल्हयामधील 282 गावांमध्ये राबविला जात असून हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जूळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने वानिकी आधारित शेती पध्दती अंतर्गत बांबु लागवड या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात करण्यात आला आहे. बांबु लागवडीचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत. प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गाव समुहातील अल्प व अत्यअल्प शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जूळवून घेण्यास सक्षम बनविणे.जमिनीची धूप थांबविणे व जमिनीचा कस वाढविणे. शेती पिकाला पूरक म्हणून बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे.शेती पध्दतीवर आधारित बांबु लागवड क्षेत्राचा विस्तार व क्षमता बांधणीसाठी सहाय्य करणे. अर्थ सहाय्य- बांबु लागवड या घटका अंतर्गत देय अनुदान बाबनिहाय मंजूर मापदंडानुसार खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 72 हजार प्रती हेक्टरचे मर्यादेत (या पैकी जी रक्कम कमी असेल ती ) अर्थ सहाय्य देय राहील. जिल्हयातील इच्छुक शेतकऱ्यांनी Online अर्ज https://dbt.mahapocra.gov.in या वेबसाईड सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.

0 Comments