Latest News

6/recent/ticker-posts

डोंगरगाव बॅरेज च्या कर्मचाऱ्यांमुळे पूरस्थिती नदीकाठच्या पिकाचे नुकसान

डोंगरगाव बॅरेज च्या कर्मचाऱ्यांमुळे पूरस्थिती नदीकाठच्या पिकाचे नुकसान


निलंगा: मांजरा नदीवरील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बॅरेज चे दरवाजे दि. 13 जुलै 22 रोजी रात्री कर्मचाऱ्यांनी वाढत्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने वेळेत उघडले नाहीत त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. मांजरा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर जाऊन शेतीपिकाचे नुकसान झाले. याविषयी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता आमची काहीही चुक नाही. नियमाप्रमाणेच वेळेत दरवाजे उघडून पाणी सोडले आसल्याचे सांगितले.

वेळेत दरवाजे उघडले माग डोंगरगाव बॅरेज अंतर्गत पूरस्थिती कशी निर्माण याची चौकशी करून नदीकाठावरील शेंद, मुगाव, मसलगा, फकरामपुर, वांजरखेडा, हालकी येथील पुर परिस्थीतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीस शासनाने मदत करावी अशी मागणी नदीकाठावरील शेतकरी


सुरेंद्र धुमाळ, रमेश मोगरगे, यादव वाडीकर, हक्कानी देशमुख, व्यंकटराव धुमाळ, ललीता पाटील, वामनराव शिंदे, दिनकर शिंदे, बापुराव कोळेकर, ज्ञानोबा कोळेकर, अंतु कोळेकर, उमा कोळेकर, सतीश कोळेकर,  राम कोळेकर, धोंडीराम कोळेकर, सुदाम कोळेकर, जीवन कोळेकर, व्यंकट कोळेकर, चंद्रकला जगताप, नरसिंग कोळेकर, किशन कोळेकर, कुमार जाधव, खंडेराव वाडीकर, बालाजी वाडीकर, तात्याराव रकटाटे, दिलीप रकटाटे आदी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.


Post a Comment

0 Comments