पिक आले होते कोवळे मस्त पण गोगलगायने खाऊन केले फस्त
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा व परिसरामध्ये सध्या गोगलगायी या सरपटणाऱ्या प्राण्याने मोठा उपद्रव दिला असून शेतकऱ्यांचे दहा-दहा एकर प्लॉट या गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन या भागातील पिके पूर्णपणे नष्ट झाल्याचे चित्र औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये तावरजा पट्ट्यात दिसून येत आहे.
त्यामुळे कोवळे पीक आले होते मस्त पण गोगलगायने खाऊन केले फस्त अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
जून मध्ये पाऊस नसल्याने पेरणी लांबली होती परंतु जुलैमध्ये कधी कधी पेरणी योग्य पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतू पुन्हा संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी नुकतीच पेरलेली कोळी पिके हे गोगलगायने फस्त केल्याने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक उत्पन्न हे गोगलगायने नष्ट केल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तोंडी तक्रार केली असता जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाने यांच्या मार्गदर्शनाने औसा तालुक्यातील कृषी खात्याची टीम भादा गावांमध्ये दाखल होऊन गावातील पिकांची काय परिस्थिती आहे.
याबाबत त्यांनी प्रत्यक्ष प्रभावित शेतीमध्ये जाऊन मोक्यावर पाहणी केली असून शेतकऱ्यांना याबाबत गोगलगाय यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाय योजना सुचवील्या आणि नुकसान झालेल्या पिकाबाबत शासनाकडून योग्य तो लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन शेतकऱ्यांना सदरील कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी, बेलकुंड जी बी राऊत,टी बी भूसे कृषि पर्यवेक्षक,सुरेखा बी गव्हाणे,कृषी सहय्यक, भादा आणि कृषि मित्र हणमंत लटूरे आदी टीमने दिले असल्याचे समजते.
माझा दहा एकर चा प्लॉट टॉवरचा प्रकल्प जवळ असल्याने या भागात शंकी गोगलगायनी पूर्णपणे उध्वस्त केला असून याबाबत शासनाने शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत करावी अशी मागणी भादा ता औसा येथील शेतकरी गोपाळ पी शिंदे यांनी केली आहे.
0 Comments