Latest News

6/recent/ticker-posts

काय तो संततधार पाऊस,काय तो गोगल गायीचा पिकावर हमला,पिक परस्थिती ओके? नाय!

काय तो संततधार पाऊस,काय तो गोगल गायीचा पिकावर हमला,पिक परस्थिती ओके? नाय!



बी डी उबाळे

औसा: मागील पाच ते सहा दिवसापासून औसा तालुक्यात संततधार पावसाची रिप-रीप सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कोवळ्या पिकात पाणी शिरल्यामुळे गोगलगाय यांचा पिकावरील हमला आणि पुन्हा पावसाचा तडाखा यामुळे कोवळी पिके पिवळी पडत आहेत.

‌यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून आपसूकच काय तो संत धार पाऊस,काय तो गोगलगाय यांचा पिकावरील हमला,सर्व परिस्थिती ओके नाय?हे उद्गार औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडून आपसूकच निघत आहेत.

‌तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप सोयाबीन, उडीद, मूग,तुर या पिकात पाणी शिरल्यामुळे कोवळ्या पिकांची वाढ खुंटत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे.

‌मागील दोन नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या असून तालुक्यात फक्त पंचवीस टक्के क्षेत्र पेरणी झाली आहे.

‌पाऊस उघडताच आता शेतकरी खरीप पेरणीला लागणार असून शेतकरी पेरणीसाठी खते बियाण्याची जमवाजमव करून पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

‌ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांना पाणी लागल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येणार असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

‌पुनर्वसू नक्षत्रामध्ये तब्बल एक आठवडा सततधार पाऊस लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रखडली आहेत.औसा तालुक्यात सरासरी 200 मिलिमीटर पावसाची सरकारी दप्तरी नोंद झाली असून जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान दिसत आहे.

‌औसा तालुक्यातील 1लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 25 टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या असून 75 टक्के क्षेत्र पेरणी विना शिलक राहिले असल्याने आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू होत आहे.

‌परंतु दररोज दिवसातून एकदा तरी पाऊस हजेरी लावत असल्याणे शेतकऱ्यांची उर्वरीत पेरणी आणि अंतर्गत मशागती लांबत जात असल्याचे चित्र औसा तालुक्यामध्ये दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments