Latest News

6/recent/ticker-posts

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांंचे स्वागत पुस्तक गुलाब पुष्पांनी केले

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांंचे स्वागत पुस्तक गुलाब पुष्पांनी केले

लातूर : दीड महिन्याच्या सुटीनंतर एरवी कंटाळवाणा वाटणारा शाळेचा पहिला दिवस आज मुलांनी आनंदात शाळेत साजरा केला . जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा मध्ये पहिल्याच दिवशी प्रवेशउत्सव,गणवेश व पुस्तक वाटप व तसेच येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिठाईवाटप करून चापोलीचे सरपंच भालचंद्र चाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा आज सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची शाळांनी दोन दिवस आधीच तयारी सुरू केली होती. त्यानंतर आज चापोली परिसरात बहुतांश शाळांमधून विद्यार्थ्यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले होते.

चापोली गावांतील जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे  गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणेच दहा  वाजता भरविण्यात आल्या.यावेळीं संपूर्ण गावांमध्ये विद्यार्थांनी प्रवेश दिंडी काढली व  जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थांना जास्तीजास्त प्रवेश करावे असे आवाहन सरपंच भालचंद्र चाटे यांनी केले. यावेळीं उपस्थित सरपंच भालचंद्र चाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुसद्दीक देशमुख, मुख्याध्यापक स्वामी, पत्रकार गणेश स्वामी, पत्रकार रियाज मनियार, विलास कांबळे, उर्दू शिक्षक महंमद जकी, बरदाळे, जकरिया, पालक व शाळेतील कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments