शिधापत्रिका नसलेली कुटूंबे व स्थलांतरीत मजूरांनाही मोफत धान्य- अमित विलासराव देशमुख
लातूर(प्रतिनिधी) २० मे कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत एकही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये म्हणून शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही किंवा जे स्थलांतरीत मजूर आहेत त्यांनाही मे व जून महिन्यासाठी मोफत धान्य देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे की, जिल्हयात अत्योदय, प्राधान्य कुटूंब, एपीएल शेतकरी कुटूंब आणि एपीएल केशरी शिधा पत्रिकाधारक यांची एकुण संख्या ४ लाख ५१ हजार असून या सर्व कुटूंबात २२ लाख ७६ हजार ८६७ सदस्य आहेत. या सर्वांना आजवर शासना मार्फत धान्य पूरवठा करण्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात काही कुटूंबाकडे शिधापत्रिका नाहीत हे लक्षात आले आहे. या शिवाय लॉकडाऊनमुळे अनेक उदयोग व्यवसाय बंद पडले आहेत. यातुन अनेक मजूर, कामगार, स्थलातरीत झाले आहेत. या मंडळीचे धान्या अभावी हाल होत असल्याचे निर्दशनास आले आहे. आता त्या सर्वांना प्रति व्यक्ति ५ किलो तांदुळ मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मे आणि जून महिन्यात हे धान्य वाटप होणार आहे. ज्यांनी शिधा पत्रीकेसाठी अर्ज केला आहे जे सामाजिक आणि आर्थिकदृष्टया दुर्बल, विस्थापीत मजूर आहेत, त्यांना अन्नधान्याची गरज आहे अशा वर्गातील लाभधारकांना धान्य मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातील छानणी होवुन अशा लोकांना स्वस्त् धान्य दुकानातुन लवकरच वाटप होणार असल्याची माहिती पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
0 Comments