मुस्लिम बांधवांनी ईद घरीच साजरी करुन प्रशासनास सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
लातूर:(प्रतिनिधी) दि.२२-कोरोना आपत्कालीन परिस्थितीत लातूर मध्ये कोणती ही कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये या करीता मुस्लिम बांधवानी आपल्या परिवारासोबतच घरी राहून रमजान ईद साजरी करावी. व नमाज करीता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ईद निमित्त आयोजित धर्म गुरुंच्या बैठकीत केले.येत्या काही दिवसात रमजान ईद असल्या कारणास्तव लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने धर्म गुरुंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लातूर मधील सर्व मुस्लिम धर्मीय धर्मगुरु उपस्थित होते.यावेळी सर्व धर्म गुरुंनी प्रशासनाचे जे नियम असतील ते नियम पाळूनच मुस्लीम समाज आपल्या घरीच राहून ईद साजरा करेल असे सांगितले. तसेच फिजीकल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन केले जाईल व कोणीही एकत्रित कोणत्याही ठिकाणी जमा होणार नाहीत असे सांगितले व तसे आवाहन ही सर्व मस्जिदीमधून यापुढे केले जाईल. व प्रशासनाला सहकार्य करु असे मत व्यक्त केले. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, लातूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
0 Comments