ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून
देव देव्हाऱ्यात नाही...अभिवादन
आज आठ वर्ष झाली.१४ऑगस्टची सकाळ लातुरकरांसाठी काळरात्र ठरली.चेहऱ्यावर कधीही दुःखाची लकेर न दिसलेला एक दिलखुलास नेता आमच्यातून निघून गेला.काळ कुणासाठी थांबत नाही.आठ वर्ष गेली मात्र महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत असा एकही दिवस गेला नाही जिथे विलासरावांची आठवण निघाली नाही.वाढपी आपला असला की शेवटच्या पंक्ती पर्यंत आपोआप पोचत हे राजकीय ज्ञान असलेल्या नेत्यांची आज कमतरता आहे.तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कालखंडात अनेक खात्याचा कारभार करताना विलासरावांनी पहिला घास लातुरकरांसठी भरवला.लातुरात प्रत्येक नवीन गोष्ट असलीच पाहिजे,असा आग्रह धरणारे ते होते.सहज आठवले.मी माझा मित्र सल्लाउद्दिन याला मराठवाड्यातील अनेक उद्योगपती मर्सिडीज घेऊन देशात विक्रम करणार होते,जवळपास दीडशे मर्सिडीज एकदाच खरेदी करायच्या होत्या.मी मित्राला आग्रह धरला आणि त्यांनी मर्सिडीज खरेदी केली.त्याने साहेब आल्यानंतर बाभळगाव येथे त्या मर्सिडीजची चावी विलासरावाच्या हातून घ्यायचे ठरवले.साहेबांनी मर्सिडीज पाहिली आणि सगळ्या कार्यकर्त्याला सांगितले,बघा आपला लातूरचा माणूस मराठवाड्याच्या एकशे पन्नास उद्योगपतीच्या यादीत आहे.लातूर बद्दलचा हा गर्व,अभिमान विलासराव बाळगून होते.लातूरकरांनी ओळखच ते होते.मी टाइम्स ऑफ इंडियाच्या रेडिओ मिरचीत काम करत होतो.मला साहेबांची पहिली मुलाखत घेऊन रेडिओची सुरुवात उद्घाटन करायचे होते. तेव्हा मुख्यमंत्री असल्याने ते प्रचंड व्यस्त होते.मी सकाळीच सांगून ठेवले,तुमच्या मुलाखतीने आमचा रेडिओ सुरू होणार आहे,मराठवाड्याचा पहिला खाजगी प्रयोग आहे.तिकडून ते म्हणाले, लातुरलाही सुरू करा,तुमच्या एम. डी.चा नंबर द्या.मला रात्री अकरा वाजता वर्षाहून फोन आला.मुलाखतीसाठी साहेब तयार आहेत.स्टुडिओतून फोन करा,आणि साहेब साडेबारा पर्यंत महाराष्ट्राचे राजकारण,अर्थकारण,समाजकारण अश्या विविध विषयावर बोलत राहिले.एक मुख्यमंत्री इतका वेळ आपल्यासाठी देतो हे सगळे कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी नवीन होते..साहेब कधीच थकले नाहीत,शेवटच्या श्वासापर्यंत ते हसत राहिले.दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्यासाठी दुःख नको,म्हणून ते स्वतःचे दुःख लपवत राहिले.त्यांच्यासाठी हा आजार शून्य होता पण नियती कोणासाठी थांबत नाही.साहेब तुम्ही आणखी काही काळ आम्हाला हवे होता,लातूरसाठी हवे होता.आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हवे होता.एकदोनदा औरंगाबाद मुक्कामी मी माझ्या अक्षरला आपल्या भेटीसाठी आणले तर आपण म्हणाला होता,साहित्यिक नाव.आहे.अक्षर खूप मोठा हो..फक्त स्वप्न ठेवून आपण आमच्यातून निघून गेलात.कुटुंबाला अस्वस्थ करून,लातूरकरांना हुरहूर लावून,मराठवाड्याला पोरके करून आणि महाराष्ट्राला अस्वस्थ करून आपण निघून गेलात.आज फक्त आठवणी जागण्याचा दिवस..तुमच्या स्मृती समोर ठेवून जगण्याचा दिवस..
"मराठी अस्मितेचा इशारा" व जेवरीकर परिवार तर्फे
तुम्हाला विनम्र अभिवादन !
संजय जेवरीकर (ज्येष्ठ पत्रकार)
0 Comments