Latest News

6/recent/ticker-posts

९१ व्या वर्षी कोरोनावर मात..

ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून


९१ व्या वर्षी कोरोनावर मात..



गण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर,कसल्याही आजारातून सहज माणूस बरा होतो हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सिध्द केले आहे..दादांना नक्कीच कुठलीतरी सिध्दी प्राप्त असावी असे मला वाटते.सुरुवातीपासूनच दादांनी एक शुचिर्भूत असे आयुष्य जगले आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत जावूनही दादा अत्यंत विनयशील जीवन जगत आले.कसलेही व्यसन नाही,कुठलाही बडेजाव नाही,येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आजही दादा स्वता भेटतात,बोलतात.साधा ग्रामपंचायत सदस्य झालं तर त्याची मान अदबीने खाली वाकत नाही..दादांनी राजकारणात अनेक चढउतार पाहिले.मान अपमान पाहिले,पण दादा खचले नाहीत किंवा खालच्या पातळीवर जावून त्यांनी कुणावर कधी टीकाही केली नाही.अजातशत्रू दादा आपल्या शानमध्ये जगत राहिले.आजही पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी केलेली कामे पटापट डोळ्यासमोर येतात.राजकीय वारसदार म्हणून त्यांनी अशोकराव पाटील यांना पुढे केले आहे.अनेक जबाबदाऱ्या त्यांना दिल्या आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून माधव माळी,अशोकराव आणि अरविंद पाटील यांनी त्यांची काळजी घेतली.दादांना admit करण्यापासून ते त्यांची सुश्रुषा करण्याचे काम ते मन लावून करत असतात.दादांच्या आयुष्यावर बोलताना त्यांच्या डोळ्यात आजही पाणी येते.दादांचे राहणीमान,खानपान आणि जगण्याची उमेद हेच त्यांचे कोरोनावर मात करण्याचे कारण आहे.अन्यथा ४५ व्या वर्षी गेलेला आमचा शिवसेनेचा वाघ नागेश माने यांचा कोरोनात झालेला मृत्यू जीवाला चटका लावणारा आहे.दादांना दीर्घायुष्य लाभो..शतकी सोहळ्यात दादांना ऐकण्याची संधी मिळो हेच ईश्वराकडे मागणे...


संजय जेवरीकर(पत्रकार)


Post a Comment

0 Comments