झाडांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी
हे वृक्ष भाऊ, आम्हा सर्वांचे रक्षण कर असे घातले साकडे
लातूर:(प्रतिनिधी) वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने आज लातूर शहरात राखी पौर्णिमा अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात आली. महिला आणि युवतींनी झाडाला आपला भाऊ मानून राखी बांधली. सर्वांचे रक्षण कर असे साकडे घातले. या उपक्रमात वैशाली मठपती, नेहा मठपती, प्रतिभा कोकणे, शारदा गावकरे, उर्मिला पेटकर, जया चव्हाण, पार्वती लातुरे, वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य अभिजीत स्वामी, संजय मठपती यांनी सहभाग नोंदवला.
0 Comments