Latest News

6/recent/ticker-posts

"रुक जाओ पार्थ ! तुम श्रेष्ठ धनुर्धर हो । 

"रुक जाओ पार्थ ! तुम श्रेष्ठ धनुर्धर हो । 



हाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काल पवार घराण्यातील पार्थाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आणि मुखातून जय श्रीराम म्हटले,त्यानंतर कोणी अजित पवार नॉट रीचेबल आहेत असे सांगितले तर कोणी अजित पवार बैठक सोडून सिल्व्हर ओकला पळाले असे सांगून बातम्या रंगवल्या.त्यावर शरद पवारांनी केलेले आजचे विधान महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.शरद पवारांनी तातडीने नातवाचे कान टोचले.माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही असे सांगून,तो अपरिपक्व आहे,त्याचा अनुभव तोकडा आहे असे सांगून पार्थच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.मला काही प्रश्न पडले की,महाराष्ट्रातील तमाम राजकारण्यांची मुले राजकारणात येताना परिपक्व असतात का?त्यांना सामाजिक भान असते का?त्यांना बोलण्याचे तंत्र,वागण्याचे तंत्र कोण शिकवत असावे?त्यांच्याकडे लोकसभेत बसण्याईतपत ज्ञान असते का?परदेशात शिकून ते आले की राजकीय बोहल्यावर लगेच कसे चढवले जातात आणि त्यांचा राजकीय संसार कसा सुरु होतो?तो भैय्या,दादा लगेच कसा होतो?त्यांना खादीचे ड्रेस कोण इतके परफेक्ट शिवून आणत असेल?त्यांना भाषणे लिहून देण्याचे काम किती भाट करत असतील?राजकारणात सतरंज्या उचलून आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्यांना का संधी मिळत नसावी?घराणेशहीतून आलेल्या राजकीय बापांच्या पोरानाच लोक का डोक्यावर घेऊन नाचत असावीत?असे अनेक प्रश्न आज पार्थ पवारच्या अपरिपक्वतेमुळे निर्माण झाले आहेत.आजच पार्थ अपरिपक्व कसा झाला?का त्याचे राजकीय लॉन्चिंग आजोबांच्या इच्छेखातर झाले?आम्ही कुणालाही,कुठेही राजकारणात पाडू शकतो आणि निवडून आणतो म्हणणाऱ्या अजित पवारांची जादू का चालली नाही? पार्थच्या मनात असलेली खदखद पवार कुटुंब का समजून घेत नाहीय?नेमके घोडे कुठे पेंड खातेय?शरद पवारांनी इतक्या अपरिपक्व माणसाला राजकारणात का टाकले?अजित पवारांची होत असलेली कोंडी कोण आणि कशी सोडवणार? हे सगळे अनुत्तरीत प्रश्न महाराष्ट्रातील तमाम राजकारण्यांना पडले असणार?मी गुगलवर पार्थ असे टाकले आणि गीतेतील एक छान संदेश दिसला..हा संदेश या पार्थाला लागू होईल की नाही सांगता येत नाही..मात्र इतिहास कोणालाही माफ करत नाही हे मात्र खरे.माझ्या आजीने माझे नाव ठेवले तेव्हा दूरदृष्टीचा संदेश देणारा संजय तिच्या डोळ्यासमोर होता असे आजही आई सांगते.पार्थ नाव ठेवले तेव्हा पार्थ पवार यांच्या आजीच्या किंवा आईच्या डोळ्यासमोर हा इतिहासातील पार्थ असेल तर हाही पार्थ नक्कीच काहीतरी राजकीय इतिहास घडवू शकेल?मात्र शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत,ते या पार्थचे काही चालू देतील असे दिसत नाही,मात्र पार्थच्या डोक्यात सुरू असलेल्या गुंत्याचा अभ्यास या कुटुंबाने नक्कीच करावा...मी वाचलेला उतारा जशास तसा वाचकांना देत आहे,त्याचा जसा अर्थ लावायचा तसा आपण लावावा..कारण प्रत्येक नावाला एक अर्थ असतो हे खरे...


"रुक जाओ पार्थ ! तुम श्रेष्ठ धनुर्धर हो । 


तुम्हें ब्रह्मास्त्र तक का ज्ञान है । फिर एक निःशस्त्र योद्धा पर अस्त्र चलाकर क्यों अपनी विद्या को लांक्षित करते हो । याद रखो ये नीति विरुद्ध है ।" अपनी मृत्यु को सन्निनिकट देख कर्ण ने अर्जुन से नीतिगत व्यवहार करने का अनुनय किया । 


पार्थ सोच में पड़ गये । उनके हाथ जड़वत हो गये । गुरु कृपचार्य की सिखायी नीति के पाठ उन्हें स्मरण हो आये । परिणामस्वरूप उनके आह्वान पर प्रकट हुआ अंजुलिकास्त्र अंतर्ध्यान हो गया ।


अर्जुन की शिथिल अवस्था योगीश्वर से छिपी न रह सकी । अर्जुन को समय जाया करते देख केशव की त्यौरियां चढ़ गयीं । क्रोधित कृष्ण अर्जुन को आदेशित करते हुये बोले । "ठिठक क्यों गये पार्थ । शरसंधान करो ।" 


"पर माधव ! कर्ण अधिरथी है और अभी रथ विहीन है । ऐसे में धर्म का आह्वान कर युद्ध करने वाला योद्धा एक निःशस्त्र पर अस्त्र कैसे चला दे । यह तो अनैतिक होगा न माधव । इससे कर्ण का वध तो हो जायेगा पर कर्ण के साथ न्याय कहाँ होगा ? " शंकालु अर्जुन ने माधव से प्रतिप्रश्न किया ।


"कर्ण के साथ न्याय पार्थ ??? किस कर्ण के साथ न्याय करना चाहते हो सखा ?? "


"उस कर्ण के साथ जिसने तुम्हारी माँ और भाइयों समेत तुम्हें वर्णावर्त में जिंदा जलाने के षड्यंत्र में सहायता की ? 


या उस कर्ण को जो स्वयंवर के बाद अपने सामर्थ्य के बल पर एक विवाहित अबला को अपह्रत करने के लिये तुमसे युद्ध करने के लिए सज्ज हो गया ?


क्या उस कर्ण के लिये न्याय जिसने कुरुवंश की कुलवधू अक्षत यौवना को वेश्या कहा ? 


या उस तथाकथित महारथी के लिये न्याय जिसने 17 वर्ष के बालक के वक्ष में खंजर घोंप दिया ?? "


योगीश्वर ने बोलना जारी रखा । 


 "श्रीमद्भागवत गीता के अप्रतिम ज्ञान को प्राप्त करने के बावजूद तुम नीति, अनीति और व्यवहारिकता के बीच का महीन अंतर नहीं जानते ?" 


"धर्म स्थापना के लिये उठाया गया हर कदम नीतिगत होता है पार्थ । तनिक सोचो यदि भगवान आशुतोष का प्रसाद ये विजय धनुष यदि पुनः कर्ण के हाथों में सुसज्जित हो गया तो न जाने कितने निर्दोषों का रक्त व्यर्थ इस कुरुक्षेत्र में बहेगा । हजारों हजार स्त्रियाँ विधवा होंगी और बच्चे अनाथ । उन्हें किस तरह नीति से सम्बल प्रदान करोगे पार्थ ?" 


"याद रखो एक अधर्मी को संकट काल के समय नीति का स्मरण हो ही जाता है । और यही नीति की दुहाई देने वाले अपना समय आने पर अनीति की हर सीमा को लाँघ जाते हैं । इसीलिये इनका वध करने हेतु शरसंधान के लिये किसी नीति का स्मरण रखना जरूरी नहीं ।। "


"किन्तु माधव ... " अर्जुन ने पुनः तर्क लड़ने की कोशिश की । 


" कुछ किन्तु परन्तु नहीं " अर्जुन की बात बीच में काट पंचम स्वर में केशव चीख उठे । "अभी के अभी अंजुलीकास्त्र का प्रयोग कर इस अधर्मी को इसके पापों की सजा दो पार्थ ।"


तुरन्त अर्जुन ने शरसंधान किया । गांडीव से अंजुलिकास्त्र का आह्वान हुआ । कर्णरंध्र तक प्रत्यंचा खिंची और सनसनाते हुये पार्थ के शरों ने कर्ण की ग्रीवा का रक्त चख लिया । अगले ही पल अनीति ने अधर्म का शिरोच्छेद कर दिया और धर्म स्थापना की नींव रखी ।


 


ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर,लातूर


Post a Comment

0 Comments