औसा तालुक्यात सर्वदूर पाऊस,पाण्यात हरवला रस्ता माझा!
बी डी उबाळे
औसा: तालुक्यामध्ये सध्या सर्व दूर पाऊस पडत असून शेती या शेतकरी उद्योगाचे रस्ते पूर्णपणे चिखलमय आणि पाणीमय झाल्याने शेतीकडे जाणे शेतकऱ्यांना मोठे कठीण वाटत आहे. यामध्येच ग्रामीण भागामध्ये शेत रस्ते हे कच्चे मातीचे असल्याने त्या रस्त्यावरती चिखल आणि पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांना पाण्यातून रस्ता काढता-काढता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या उद्योगाकडे जाणारे रस्ते चिखल आणि पाण्यात हरवल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भादा- शिवली, आणि भादा -वरवडा,शिंदेवाडी,कोळेवाडी, येल्लोरी, कोरंगला, उटी,घुगी, कोरंगळा, समदर्गा आदि रस्ते मोठे खराब झाले असून या रस्त्याकडे शासन आणि प्रशासन यांचेही लक्ष नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आणून दिलेली आहे.
तसेच औसा तालुक्यात पुढारी भाराभर ! तरीही परिसरातील अनेक रस्ते आणि औसा तालुक्यामध्ये रस्ते अडचणीचे असल्याचे दिसून येत आहे.
परंतु या बाबीकडे जी प सदस्य,आमदार,खासदार यापैकी कोणाचेही लक्ष नसल्याने या भागातील शेतकरी वर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे.
गावोगावच्या सरपंचांनी प्रशासकीय स्तरावर सतत रस्त्यासाठी प्रयत्न केले पण कामी नाही आले अशी आवस्था औसा तालुक्यातील विविध गावाची झाली असल्याचे समजते.
0 Comments