Latest News

6/recent/ticker-posts

क्राईस्ट स्कूलमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

क्राईस्ट स्कूलमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.


तळेगाव : क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. 20 जून शुक्रवार रोजी आजी-माजी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या जेबाबेरला नादार, मुख्य मार्गदर्शक संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड,  तसेच शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, आजी-माजी सत्कारमूर्ती विद्यार्थी, पालक, शाळेतील शिक्षक व विद्यार्थीही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. प्रास्ताविक संगमेश्वर ढगे यांनी केले. माजी विद्यार्थिनी मनस्वी राजकुमार रटकल्ले NEET मध्ये 530 गुण, विद्यार्थी अनमोल गजानन पाटील याने JEE मध्ये 99.17% तर MHT CET मध्ये 99.83% मिळविल्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी मधील शाळेचे गुणवंत विद्यार्थी सात्विक बालाजी कासले प्रथम, अन्वेषा बालाजी सोमावार द्वितीय, प्रणाली प्रशांत वाघमोडे तृतीय, शरयू शैलेश पाटील, प्रगती तरुण मुजुमदार, विराल विकास मेवारा यांचाही शाळेच्या वतीने संस्थाचालकांच्या हस्ते पालकांसमवेत गुणगौरव करण्यात आला.

मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड विद्यार्थ्यांना तसेच पालकांना उद्देशून म्हणाले की, 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. आपल्या विद्यालयाचा मागील दहा वर्षापासून 100 टक्के निकाल ही आमच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावतीच आहे. विद्यार्थी मित्रांनो मोठी स्वप्नं पहा. UPSC/MPSC परीक्षेकडे सकारात्मकतेने पहा, योजना करा आणि अंमलात आणा. प्रामाणिक कष्ट केल्यास नक्की फळ मिळते यावर विश्वास ठेवा. 12 वी नंतर किमान 10 तास व शाळेतील विद्यार्थ्यांनी 6 तास अभ्यास करावा तरच तुमचे मोठे स्वप्न पूर्ण होईल असेही ते म्हणाले. शाळेवर पालकांनी ठेवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. नेहमी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. विद्यार्थी-पालक-शिक्षक ही त्रिसूत्री आहे. यात पालकांचेही तेवढेच सहकार्य अपेक्षित असते. सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक राहुल अडसूळ यांनी केले. प्राचार्या जेबाबेरला नादार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुपरवायजर गोविंद वलसे, गोपाल गवळी, उज्ज्वल सोनी, बालाजी कांडणगिरे यांनी अथक मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments