मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनील ईरावार याच्या घरच्यांशी फोनवरुन संवाद साधला
नांदेड:(प्रतिनिधी) जिल्ह्यातील किनवट येथील मनसे शहराध्यक्ष सुनील ईरावार यांच्या आत्महत्येने कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जात आणि पैसा यावर येथील राजकारण चालते, त्यामुळे मी यापुढचं राजकारण करु शकत नाही असं सांगत सुनीलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर स्वत: राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना धीर सोडू नका असं आवाहन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सुनील ईरावार याच्या घरच्यांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी सुनीलचा भाऊ अनिल ईरावार यांच्याशी राज ठाकरे यांचे बोलणं झालं, काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन. काळजी घ्या असं सात्वन राज ठाकरेंनी सुनीलच्या कुटुंबाचं केले.
राज ठाकरे व अनिल ईरावार यांच्यात भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषण
राज ठाकरे: हॅलो,अनिल नमस्कार,जय महाराष्ट्र
राज ठाकरे बोलतोय
अनिल ईरावार: जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र वाघ गेला तुमचा... खूप प्रेम करायचा तुमच्यावर साहेब
राज ठाकरे: पण काय झालं त्याला अचानक ?
अनिल ईरावार: हसत-खेळत होता, काहीच कल्पना नाही, घरी भांडण नाही
राज ठाकरे: मग काय झालं त्याला?
अनिल ईरावार: अचानकच, कोणतं टेन्शन होतं काही माहिती.
राज ठाकरे: कसलं टेन्शन? माझ्याशी बोलायचं तरी.
अनिल ईरावार: मला खूप वेळा बोलला, साहेबांना भेटलो माझी किस्मत मोठी आहे, खूप भाग्यवान आहे.
राज ठाकरे: घरी कोण कोण असतं?
अनिल ईरावार: आम्ही सगळे एकत्रित कुटुंबात राहतो, ४ भाऊ, वहिनी, आताच एन्गेजमेंट झाली होती.
राज ठाकरे: काळजी घ्या, काही दिवसांनी मी स्वत: घरी येईन भेटायला, काळजी घ्या.असं सात्वन राज ठाकरेंनी सुनीलच्या कुटुंबाचं केले.
0 Comments