औसा शहरात सर्वाधिक रूग्ण संख्या असतानाही लाॅकडाऊन चा फज्जा
औसा.(तालुका प्रतिनिधी बी.जी शेख)दि. ४ - शहरासह तालुक्यात कोरोणा रुग्णांची संख्या अधिक असतानाही या आजाराकडे स्थानिक जनता व शासकीय कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहावयास मिळते.
शासकीय कार्यालयांची जबाबदारी ही असते की आपल्या कार्यालयापुढे जे ग्राहक किंवा काही कामानिमित्त आलेल्या जनतेत सोशल डिस्टंसिंग चे पालन होत आहे किंवा नाही हे पाहणे, मात्र शहरात जागोजागी जनतेची झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळते. विशेषतः बँकेसमोर असलेल्या गर्दीचे नियोजन त्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकाकडे असते मात्र बँकेचे व्यवस्थापन व्यवस्थित नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कडक लाॅकडऊन असतानाही शहरात किराणा दुकान, मेडिकल, बँकेसमोर गर्दी दिसून येते.
नगरपालिकेने आपल्या बैठकांमध्ये पेट्रोलिंग करण्याचा ठराव मंजूर केला होता .मात्र शहरात अशी एकही टीम कार्यान्वित दिसून आली नाही. "बोलाचाच भात व बोलाचीच कढी" अशी परिस्थिती नगरपालिकेची झाली आहे. ज्यावेळेस रुग्ण संख्या शहरात नव्हती त्यावेळेला नगरपालिकेने हे श्रेय आमचे आहे असे छातीठोकपणे सांगितले होते .मात्र शहरात सरासरी दररोज १० रुग्ण संख्या वाढत असताना याला जबाबदार कोण हा प्रश्न जाणकारतून विचारला जात आहे.
0 Comments