ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है? '
काल परवा पुन्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी डॉक्टरपेक्षा कंपाउंडर चांगले असे म्हणत महाराष्ट्रात तापत असलेल्या सुशांतसिंग केसवर त्यांना पडदा टाकायचा होता की महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करायची होती हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा चर्चेत येत आहे.मुंबई पोलिसांनी मागच्या पंधरा दिवसात का यामध्ये कोणावरही गुन्हा दाखल केला नाही.उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात आहेत का?ठाकरे कुटुंबांच्या विरोधात असलेली सगळीच मंडळी त्यात नारायण राणे त्यांचे चिरंजीव आणि पार्थ पवार यांचे सत्यमेव जयते असे केलेले ट्विट आज चर्चेत आले आहे.या सगळ्यांवर पडदा टाकण्यासाठी संजय राऊत यांनी डॉक्टरवर हल्ला केला का? असेही बोलले जात आहे.बिहार राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे काय?त्यामुळे सुशांतसिंग राजपूत यांनी केस राजकीय उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.केंद्र विरूद्ध राज्यच्या या लढाईत संजय राऊत पुन्हा कोणते वादग्रस्त विधान करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रत्येक पायरीवर अडचणीत आणून संजय राऊत नेमके काय साध्य करत आहेत?काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी केलेली विधाने मासल्यासाठी देत आहे..
महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर राऊत यांनी केलेले विधान..
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजप नेत्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं," असं संजय राऊत यांनी म्हटलं आणि उदयनराजे यांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.उदयनराजे यांनीही राजीनामा द्यावा असे म्हटले होते.तेव्हा उदयनराजे म्हणाले होते,शिवसेनेसाठी महाराजांचा वापर करताना ठाकरेंनी माझी परवानगी घेतली होती का?
उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray@ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
दैनिक लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यावेळी संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं होत..त्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
Indira ji was a true patriot who never compromised on India’s national security.
As former @INCMumbai President, I demand that @rautsanjay61 ji withdraws his ill-informed statement.
Political leaders must show restraint before distorting the legacies of deceased Prime Ministers
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) January 16, 2020
त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केले होते..
त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले ज्यांना मुंबईचा इतिहास माहीत नाही त्यांनी या विषयावर बोलू नये.
Kareem Lala was leader of Pathan community, he led an organisation called 'Pakhtun-e-Hind'. It was in this capacity of the leader of Pathan community that he met several top leaders including Indira Gandhi
However, those who do not the history of Mumbai, r twisting my statement
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 16, 2020
करीम लाला पुख्तून-ए-हिंद या पठाणांच्या संघटनेचे प्रमुख होते. त्या निमित्ताने त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे. म्हणून ते इंदिरा गांधींना भेटायला गेले होते, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं. तरीदेखील काँग्रेसने टीका करणं सोडलं नाही. यानंतर मात्र संजय राऊत यांना माघार घ्यावी लागली. जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो असं त्यांनी स्पष्ट केलं होतं...
शिवसेना नेते संजय राऊत असे का बोलत सुटले आहेत?वारंवार वादग्रस्त विधाने करून त्यांना काय साध्य करायचे आहे?भाजप सोबत असतानाची आणि आताची विधाने परस्परपूरक आहेत की विरोधी?ते स्वतः बोलतात की त्यांचा बोलविता धनी दुसरा कोण आहे?त्यांना असे बोलून उद्धव ठाकरेंना अडचणीत टाकायचे आहे का?स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नाही काय?शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये महाराष्ट्राचे सरकार बनवताना काही छुपा अजेंडा ठरला होता का?ठरला असेल तर ते बाजूला राहिले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसले का?पत्रकारांच्या प्रश्नावर पावलोपावली त्यांना घुस्सा(राग) का येतो?शिवसेनेतील इतर नेते आज अबोल का आहेत?महाराष्ट्राच्या सत्तेवर शिवसेना आणि काँग्रेसची छाप का वाटत नाही?प्रत्येकवेळी उदयन राजे भोसले यांच्याविरोधात बोलून संजय राऊत नेमके काय सिद्ध करू इच्छितात?काँग्रेस विचारधारा आणि हिंदुत्ववादी विचारधारा यात सरमिसळ होत आहे का?काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जावून वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे काय?अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे संजय राऊत यांच्या वारंवार बोलण्यातून निघताना दिसत आहे..या सगळ्या विधानांमुळे शिवसेना अडचणीत येत आहे..सततच्या राऊत यांच्या विधानामुळे ठाकरे सरकार अडचणीत येत असून ..पत्रकारांनी कुठलाही प्रश्न विचारल्यावर घुस्सा का येतो?बघू या यावर शिवसेना काय कारवाई करते..
संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार)
0 Comments