Latest News

6/recent/ticker-posts

ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये- ओबीसी ब्रिगेड

ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये- ओबीसी ब्रिगेड


शेख बी जी

लातूर: दि.12 आरक्षणाशिवाय महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक होणार आहेत. ह्या ओबीसी समाजावर अन्याय आहे. निवडणूक आयोग ओबीसींना डावलून निवडणुका घेण्याचे पाप करत आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी ओबीसी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे ओबीसी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुदर्शन बोराडे  मागासवर्गीय आयोगाच्या वतीने जातीनिहाय जनना करण्याचे काम चालू आहे. मात्र ही जनगणना चुकीच्या पद्धतीने सुरू असून यामध्ये ओबीसीच्या जातीवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण मागासवर्गीय आयोगाने इम्पेरियल डाटा गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यावर आडनावरून जनगणना केली जात आहे. हे चुकीचे आहे एक एक आडनावाचे वेगवेगळ्या जातीमध्ये बरेच लोक असतात. त्यामुळे सरकार चुकीच्या पद्धतीने जनगणना अहवाल स्वीकारत असेल तर ते कदापि योग्य होणार नाही. यासाठी आम्हाला वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. मोठ्या प्रमाणावर घोषणाच होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रही नाहीत. ओबीसीची स्कॉलरशिप वेळेवर भेटत नाही. नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, ओबीसीचा बॅकलॉग भरलेला नाही. हा तात्काळ लवकरात लवकर भरावा. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी यांना यांची जागा दाखवील. अशा आशयाचे निवेदन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments