रिक्षात विसरलेली प्रवाशांची बँग रिक्षाचालकाने केली परत; प्रामाणिक ऑटो चालकाचा जिल्हा पोलीस अधीक्षकानी केला सत्कार
लातूर: आषाढी एकादशी निमित्त माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत पंढरपूर वारी दर्शनासाठी लातूर शहरातील काही भक्त विवेकानंद चौकातून एका ऑटो रिक्षाने अशोक हॉटेलपर्यंत आले. या वेळेला त्या भक्तांच्या बॅग ऑटो रिक्षामध्येच विसरून राहिल्या... पंढरपूर दर्शन या पवित्र कामासाठी निघालेल्या भाविकांच्या बॅग आपल्या ऑटोमध्ये चुकून विसरून राहिल्याचे लक्षात आल्यानंतर ऑटो रिक्षा चालक " शेख " याने अर्ध्या रस्त्यातून परत येऊन त्या भाविकांच्या बॅग अशोक हॉटेल चौकातील ट्रॅव्हल्स पॉईंट वरती आणून दिल्या. ज्याच्या प्रामाणिकपणाबद्दल माझा लातूर परिवाराच्यावतीने ऑटोरिक्षा चालकाचा सत्कार माझं लातूर परिवाराच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
0 Comments