तगरखेडा येथे वीज पडून गोरोबा सूर्यवंशी यांचे दुर्दैवी मृत्यू
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात शेळी पालन करणारे गोरोबा रामा सुर्यवंशी हे तगरखेडा शिवारामध्ये शेळ्या चारत होते विजांचा कडकडाट होत असल्याने आपल्या शेळ्या व स्वतः एका चिंचेच्या झाडाखाली थांबले होते परंतु अचानक विजेचा कडकडाट झाला व चिंचेच्या झाडाखाली थांबलेले गोरोबा सूर्यवंशी यांच्या अंगावर विज पडून त्यांचा सायंकाळी अंदाजे पाच वाजता दुर्दैवी मृत्यू झाला आहे ते 65 वर्षाचे होते. तगरखेडा येथील गोरोबा रामा सूर्यवंशी यांना शेती नसल्यामुळे ते शेळी पालनाचा व्यवसाय करत होते व आपली उपजीविका भागवत होते परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं आज शेळ्या चारत असताना अचानक झाडाखाली थांबले असता त्यांच्यावर वीज पडून त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे संबंधित ठिकाणी आवारात पोलिस स्टेशनचे पोलिस पथक येऊन पंचनामा केला असून गावचे सरपंच केवळबाई सूर्यवंशी व पोलीस पाटील, अभंग सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पूर्ण माहिती पोलिसांना दिली त्या गरीब शेळीपालन करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासन स्तरावर आर्थिक मदत करावी अशी मागणी पोलीस पाटील सरपंच व कुटुंबियाकडून केली जात आहे.
0 Comments