Latest News

6/recent/ticker-posts

पावसामुळे जनजीवन विस्कळीत;खरीप पेरण्या रखडल्या

पावसामुळे जनजीवन विस्कळीत;खरीप पेरण्या रखडल्या


बी डी उबाळे

औसा: मागील चार दिवसापासून औसा तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू असून दिवस-रात्र रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या खोळंबल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

सूर्याच्या मागील मघा आणि आर्द्रा या दोन नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तालुक्यात मोजक्याच पेरण्या झाल्या होत्या.

 त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या सध्या रखडल्या असून चार दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप पेरणी साठी पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

औसा तालुक्यामध्ये केवळ एकूण क्षेत्र 1लाख 10 हजार 632.82 या क्षेत्रा पैकी केवळ 25 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून 75 टक्के खरीपाचे क्षेत्र पेरणी विना राहिले आहे.

संततधार पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरी मोठी धावपळ उडाली आहे.

तसेच बाजारपेठेत ही ग्राहक मंदावले असून पावसामुळे नागरीक घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत.

 खरीप पेरणी लांबणीवर पडल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची रिपरीप सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचणी येत आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाची ही रिप रीप पावसामुळे अडचण झाली आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने डोळे वटारले होते परंतु आता पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत पेरणी उशिरा जरी झाली तरी खरीप पिके काही प्रमाणात पदरात घेता येऊ शकतात याची शेतकऱ्यांना अशा लागली असून संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments