Latest News

6/recent/ticker-posts

लागताच पतीच्या जिद्दीची चाहुल,पत्नीनेही ठेवले पावलावर पाउल

लागताच पतीच्या जिद्दीची चाहुल,पत्नीनेही ठेवले पावलावर पाउल

 

संकटावर मात करायचा दोघांच्याही मनात भरला राग घामाच्या धारातुन फुलवली आंब्याची बाग 

दुर्दैवाने जरी गमावला हात, केली  दुरदम्य इच्छा   शक्तीने परस्थिती वर मात

बी डी उबाळे

सा-तालुक्यातील भादा येथील शेतकरी दयानंद काशिनाथ माळी(५०) यांनी आपल्या एका हाताने अपंग असल्याने त्यांनी त्यावर मात करून आपली शेती चांगल्या प्रकारे फुलविली असून ही शेती करण्यासाठी पत्नीची खंबीर साथ मिळाली आहे. वय वर्ष १५ असताना एका अपघातामध्ये दयानंद माळी यांचा उजवा हात काखेतून काढावा लागला आणि ते अपंग झाले परंतु मनात जिद्द,संसाराची,गोडी, चिकाटी,इच्छा आणि मोठ्या आकांक्षा असल्याने त्यांनी आपल्या 25 एकर शेतीमध्ये स्वतः राबून आपली दोन मुले एक महामंडळात मेकॅनिकल आणि दुसरा इंजिनियर आणि मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर अशी तीनही अपत्य उच्चशिक्षित बनविली असून त्यांनी आपण अपंग असल्याची कधीही कुटुंबाला किंवा समाजाला आपल्या कर्तृत्वातून जानिव आणि उणीव होऊ दिली नाही यामुळे भादा आणि परिसरात दयानंद काशिनाथ माळी हे एक उत्तम शेतकरी आणि कुशल असे शेतीचे तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेती सुधारली असून 

जवळपास 1 हेक्ट शेतीमध्ये १०० झाडे आंब्याची लागवड करून फळबाग केली असून चांगल्या प्रकारे आंब्याची फळझाडे जोपासली आहेत यामुळे त्यांची शेती सध्या चांगल्याप्रकारे फुलली असून या शेती मधून त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते यामुळे ते अपंग आहेत याची उणीव आणि जाणीव भादासह परिसरात कोणालाही होत नाही कारण त्यांचे कर्तत्व आणि घरा प्रती नेतृत्व खंबीर असल्याने त्यांची जीवनशैली ही उत्तम कुशल संघटनात्मक असल्याने त्यांनी आपली आर्थिक प्रगती शेतीमधून चांगल्या प्रकारे करून घेतली आहे आणि आपली मुले ही उच्चशिक्षित बनविली आहेत ज्यामुळे यांच्याकडून अपंगत्वावर कशी मात करावी आणि शेती व्यवसायात कशा प्रकारे तंत्रज्ञान वापरून उत्तम उत्पादन काडुन तीनही मुले उच्च शिक्षित बनविणे हे यांच्याकडून समाजाने प्रेरणा घेण्यासारखे एक चांगले उत्तम उदाहरण आहे.

Post a Comment

0 Comments